शासकीय इतमामात संपन्न होणारे हे साहित्य संमेलन चर्चेचा विषय ठरतो. संस्थेच्या वतीने दरवर्षी त्या दहा मुली दत्तक घेऊन त्यांचा सर्व खर्च मोफत करतात. आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिरे घेतात. शेतकऱ्यांना मोफत झाडांचे वाटप करतात. कर्तबगार स्त्रियांना पुरस्कार देऊन सन्मानित करतात . पुण्यामध्ये सदाशिव पेठेत ४०० कर्तबगार स्त्रियांचा सन्मान करून एका भव्य – दिव्य कार्यक्रमाचे आयोजनही त्यांनी केले आहे. अक्षरयात्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे काम अव्याहतपणे सुरू असते. गोरगरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांच्या विवाहासाठी ही संस्था मदत करते. पती-पत्नीच्या नात्यातील समुपदेशन करण्याचे काम संस्थेच्या वतीने केले जाते. वर्षभर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर दिलेल्या व्याख्यानातून आलेले मानधन हाच अक्षरयात्री प्रतिष्ठानचा स्रोत असतो.







